आई...!
आई...!
आई बद्दल किती लिहावं
किती लिहू नये
हा प्रश्नच
कधी उद्भवत नाही
पण
कधी लिहिलं ही जात नाही
कधी वाचलं ही जात नाही
लेखणी थिटी पडते
विचार कुंठतात
मनात घर करतात
काही केल्या
ते मुळात बाहेरच पडत नाहीत
अगदी संपृक्त द्रावणा सारखी
अवस्था होते
जिथे विचारांची झेप
कधी पोहचतच नाही
अक्षरांचे शब्द होत नाहीत
शब्दांचे वाक्य होत नाही
वाक्यांच्या ओली होत नाहीत
सार कस स्तब्दच
मग वाटत
वाटत ते लिहता येत नाही
तर लिहायचं कशाला
सदा असतेना ती उशाला
मग इतकं बस झालं
जन्माचं सार्थक झालं
तिच्या पोटी जन्म हेच
खर सौभाग्य
साता जन्माची पुण्याई
अशी
की आई हा जन्म तुझ्या पोटी..
हा विचार मनात आला
तीने पोटाशी घेतले
आणि हसून म्हणाली
माझं सोनूल ते...!
सार भरून पावलो
म्हंटल देवा
आता काही नको
आई दिलीस खूप झालं
मी सुखी आहे
समाधानी आहे
आनंदी आहे..!
नाही तरी आणखीन
काय हव जीवनात...?