लग्न
लग्न
सोहळा होता
माझं लग्न
सर्वच होते
त्यात मग्न
अक्षदा पडल्या
मग डोईवर
लोकांचे लक्ष
जेवणाच्या पत्रावळीवर
बसली पहिली
पंगत मोठी
जेवणात होती
बासुंदीची वाटी
दुसऱ्या पंगतीत
भात संपला
बासुंदीने तर
तळच गाठला
शेवटी जेवण
हॉटेलमधून मागवले
कसेबसे भोजनकार्य
पार पडले