दाटले आभाळ काळे
अंधारल्या साऱ्या दिशा
उगवतीचा तो सूर्य माझा
हरवला हा आज का
स्वप्नांची पहाट ही
रात्र झाली काळोखी
वेळ ही कुठली उमजेना
काय झाले सांग ना
हरवले शब्द सारे
मूक झाल्या भावना
मिटलेल्या ह्या साऱ्या पाकळ्या
उलगडू कश्या मी सांग ना
कोडं हे सुटेना
भान हे परतेना
राहिले हे गीत अधुरे
पूर्ण करण्या परत ना