संपवू त्या तिघांना
संपवू त्या तिघांना
'अनिती'नं 'स्वैराचारा'शी घरोबा करून सवत धर्म पाळला
'निती'नंही मग' विकास'चा धावा केला.
विकास म्हणे, नितीला घाबरून नकोस ताई
मी सदैव तुझ्या सोबतीला
काहीही झालं तरी आपणंच संपवू त्या तिघांना
विकास म्हणाला स्वैराचारास का रे बाबा असं वागतोस ?
विनाकारण तू का आम्हास छळतोस
स्वैराचार म्हणे विकासला आता दिवस तुझे भरले
कोण विचारतो तुला, उलट भ्रष्टाचाराची साथ आहे मला
विकास म्हणाला स्वैराचारास सोबत तुझ्या अनिती असो की भ्रष्टाचार
विजय शेवटी आमचाच होईल इतिहास आहे साक्षीला.
चल गं ताई मिळुनी सर्वजण संपवू बघ तिघांना
कारण भारतभूमीचे सुपुत्र आहेत आपुल्या सोबतीला.