वेळ आलीय.....
वेळ आलीय.....
आज मी सांगणार आहे एक साधी कहाणी
प्रत्यक्ष एका मनुष्याच्याच जुबानी
डोळ्यात घालून थोडं वंगण आणि पाणी
एकवतो मनुष्याच्या दुःखाची अदभूत वाणी
एकेकाळी मनुष्य सांगायचा चंद्राची कहाणी
काहीवर्षात तो पोहोचला तिथे शोधायला थोडं पाणी
तेथूनच त्याने चालवली आपली कर्तृत्वाची वाणी
अन पूर्ण वेळ कामात देऊन तो झाला मोठा ज्ञानी
वेळ कामात देऊन त्याने जग जिंकलं युद्धातुनी
आणि तो झाला मोठा श्रीमंत पटकनवानी
पण इथेच त्याची बाजू थोडी चुकली कामातूनी
पूर्ण वेळ कामात देऊन शरीर झालंय भुसाहुनी
संपूर्ण वेळ कामात जणू काम मोठं ईश्वराहुनी
रात्रंदिवस काम करून शरीर फूटतय चहूबाजूनी
याला म्हणावा वेडेपणा की काय आनंद यातूनी
शरीराची निगा राखा जरा तिची ओळख थोडी जाणुनी
आता मात्र जागायला हवं नाहीत वेळ निघेल हातूनी
राहील इथे केवळ आत्मा शरीर जाईल कुजवाचुणी
पोकळवसा होईल त्याचा काय अर्थ रात्र जागुणी
महत्व देऊ शकतो त्याला फक्त त्याची किम्मत राखुनी
व्यायाम आहार अन् झोप आहे खरे औषधपाणी
तिच शरीराची खरी गरज जणू आहे संतांची वाणी
आपली काळजी आपलीच, नको ठेवू नोकर ज्ञानी
काळजी घे स्वतःची हीच आहे तुझी खरी कहाणी.