बहर
बहर
जगण्याला बहर आला
मनाला पालवी फुटली
मातीतून माणसं ऊगवली
तडा गेलेली मनं मी लीपली
तडकलेल्या भिंतींना
दिलं सेणामातीच लिपटनं
सुगंधात मनं रमल असं
भविष्याच्या नक्षीच केलं रेखाटन
वळणा वळणांवर दु:खांचे डोंगर
दु:खितांना घास भरवायचे आहे
पुढेपुढे धावत जगतांनाही
दु:खितांना जीव लावायचाआहे
कुठे पहाड कुठे दरी
सपाटीकरणाचा सपाटा नको
जीवनात सौंदर्य भरू
कुठलाही कुणाशी घातपात नको
शस्ञापेक्षाही शब्दच शस्त्र
उध्वस्त ना हो कुणाचे जीवन
सहज भाव ठेऊ मनात
मिळेल सर्वांना सन्मानांचे जीवन
टनक झालेले ढेकुल विरते
सरीत होऊन विलीन असे
वार तर होनारच आहे
त्या शिवाय सख्या ते प्रेमच कसे
नव्या वाटा नवे जीवन
नवेच नवे हे नवे पण
तू हो तनमनाने माझा
सुगंधीत होईल नाते पण