आई
आई
आई नावाची एक कथा
प्रत्येकाच्या आयुष्यात असते
पण ती जवळ असताना
तिला चाळायची सवडच नसते
तिच्या वरची प्रत्येक ओळ
मायेची,प्रेमाची ,विश्वासाची असते
तिच्यातला प्रत्येक प्रसंग
हळवा ,देखणा ,अनुभवाची साक्ष असते
पण ही कथा कळायला ..तिला
मनापासून वाचायचं असते
कारण प्रत्येक पानावरच्या
तिच्या मजकुरात काहीतरी खास असते
आई नावाची ही कथा
वाचता वाचताच शिकवत असते
आणि ती सोबत नसली की
ओळ न् ओळ तीची आठवत असते
कधी कधी तिलाही मायेने गोंजारायच असते
कधी कधी तिच्याशी प्रेमाने बोलायचं असते
आपल्यातली बालीशता इतकी व्यस्त असते
तिला ते कळतचं नसते .,,पण आई नावाची कथा
इतकी उदार असते..की आपण मोठे झाल्यावरही
आपल्याला ती काहीतरी देतच असते
सरता सरता ही कथा..संपुच नये असच वाटत असते
कारण ,शेवटच्या पानावरच्या शेवटच्या ओळीत
एक वास्तववादी सत्य असते...
"आपल्या आयुष्याची जेव्हा कथा होते..तेव्हाच तिच्यातली
व्यथा कळत असते ..आणि हे सत्य स्विकारुन आयुष्य जगणे
हेच प्रत्येक आईच्या वाट्याला येत असते".