बाकी काही नाही
बाकी काही नाही
विषम हवामानाचा परिणाम
होतो शरीरावर ,आजारी पडतो
बरेही होऊन जातो यथावकाश
शरीराने हिंडू-फिरू लागतो
या आजारपणात मन आजारी पडते
पण मनाचा आजार लक्षात येत नाही
काही तरी बिनसलंय त्याचं,
इतकेच कळते
अदलुन - बदलून डॉक्टर देतात औषधी
तरी पण आजाराचे निदान होत नाही
असा कसा विचित्र आजार हा ? ..!
काहीच कसे कळत नाही ?
सुरु ठेवावी लागते लढाई जगण्याची
पोटात ढकलावे लागतात चार घास
नि पुरवावे लागतात चोचले शरीराचे
गेलोत विसरून मन नि त्याची आस
जाऊ द्या , लक्ष देऊ नये या सेंटी -मनाकडे
काही तरी बिनसलंय त्याचं बाकी काही नाही
होईल आपोआप बरं ,त्याचे काही नाही .
शरीर धावतंय न यंत्रागत ..तेव्हढे पुरे ...!