असं का ?
असं का ?
काय करायचं असतं अन्
माणसं काय करुन जातात
बोलायचं असतं महत्त्वाचं
नेमकं तेच का विसरुन जातात ?
फोनवरतीच वेळ सगळा
मुलं आपली घालवतात सतत
आई बापाने समजावलं तरी
ते त्यांना का नाही पटत ?
महागड्या दुकानांतून खरेदी
सर्वच करतात बिनदिक्कत
समाज कार्य करताना मात्र
सहसा कोणी का नाही दिसत ?
मोठेपणा मिरवण्या साठी
माणसं वायफळ असतात बोलत
कौटुंबिक संवाद साधण्यासाठी
कधी कुणी का नाहीं भेटत ?
सीमेवर वरती मरतो सैनिक
त्याचे नसते सोयर सुतक
क्रिकेट मध्ये गेली विकेट
तर ते एवढं का वाटत घातक ?