का न माघारी वळला
का न माघारी वळला
का न माघारी वळला
विरहदाही हा भरत तळमळला ।
श्रीरामा सांगा का न माघारी वळला ।।
विनविले बहु आर्त स्वरांनी ।
चरण भिजविले नयनजलांनी ।
शब्द संपविले मी याचनांनी ।
कसा तरीही तुझा दयार्णव आटला ।।1।।
माझा नव्हता कधीच दावा ।
कितीदा सांगू तुजला भावा ।
मम मातेचा घातकी कावा ।
आज भरत रघुकुलाचा कलंक ठरला ।।2।।
बालपणीचा काळ आठवा ।
हात हातीचा कधी न सुटावा ।
प्राण शरीरास पुन्हा भेटावा ।
महापूर हृदयीचा नयनी दाटला ।।3।।
अचेतन सारी झाली चेतना ।
ध्यास तुमचा रातदिन मना ।
लवकरी मज येऊन भेटना ।
चतुर्दश वर्षीचा आता दुष्काळही सरला ।।4।।
अजुनि तुमची वार्ता येईना ।
माझ्या मनाची होई दैना ।
न आला तरी त्यागीन प्राणा ।
का स्नेह तुमचा मजवरील संपला ।।5।।