वादळ
वादळ
भावनेतून बाहेर येत ताकदीने
संकटाचा सामना केल्या जातो,
पण त्या सामन्याच वादळ
काही दिवसांतच शांत होत...
वाईटाच्या मागे लागताना
हिमतीने लढा दिल्या जातो,
पण त्या लढ्याच वादळ
काही दिवसांतच शांत होत..
अन्यायच्या विरोधात उभं राहताना
जिद्दीने मनुष्यबळ एकवटल्या जात,
पण त्या मनुष्यबळाच वादळ मात्र
काही दिवसांतच शांत होऊन जातं...