STORYMIRROR

Sanjay Gurav

Tragedy

3  

Sanjay Gurav

Tragedy

उदास हळव्या रात्री

उदास हळव्या रात्री

1 min
283


खूप काही सांगून जातात

या उदास हळव्या रात्री

परतीच्या वाटसरु आठवणी

आसवांच्या गावच्या यात्री.

धुम्र वलये उठतात किती

विरतात किती उरतात किती

भिरभिरत नजर धोका खाती

तेल संपलेल्या फडफडती वाती.

निशेची विवंचना उजेडात नाही

शीतल प्रहर मग व्हावी का लाही

ओळखीच्या असूनही धूसर दाही

काळोखातही मन काय पाहत राही.?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy