पत्र
पत्र
इंटरनेटच्या दशकात आता दिसत नाही
त्या पत्रातल्या आपलेपणाची चाहूल,
नाही दिसत हाताच्या त्या अक्षरांच प्रेम
आणि नाही येत तो प्रेमाचा गंध...
लिहिता लिहिता कधी डोळ्यांतून वाहणाऱ्या
त्या भावनांनी ओले झाले तरी
वाळून परत आधीसारखा होणारा तो कागदाचा कोपरा
आणि त्यामुळे उगाच पसरलेली शाई...
अन् वाळल्यावरही पडलेल्या अश्रूंच्या थेंबाची
जाणीव होऊ देणारा तो कागद...
म्हणूनच आजही ती पत्रं मनाच्या एका कोपऱ्यात अजुनही तसेच आहेत
एखाद्या दागिन्याप्रमाणे...