मरण...
मरण...
मरण तर आहे एके दिवशी
पण जगा ना थोडं,
असं जगा, कुणीतरी म्हणावं की,
यांनी दिलंय मला जीवन...
याच्यामुळेच जगतोय मी...
कुणाच्यातरी जीवनातील अंधार
व्हावा दूर तुमच्यामुळे...
कुणालातरी मिळावे जीवनदान...
कुणाच्या तरी मुलाबाळाचे मिळावेत आशिर्वाद...
कुणीतरी म्हणावे...
देव माणूस गेला...
कुणाच्यातरी डोळयात
यावेत दोन थेंब...
कुणाचे तरी करा भले थोडेतरी...
मेल्यावर त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून
कोणीतरी उभं राहावं...
चार खांदेकरी तरी यावेत वेळेवर...
बरं झालं मेला ते
असं तरी म्हणू नये कोणी...
नुसता भार होऊंन जगण्यापेक्षा
नाव उरेल एवढे तरी करा...
नाही तरी जन्म व्यर्थच...
किर्ती अमर असते म्हणे
महात्म्यांची...
खरंच महात्मा व्हाल का...???