कर्ण
कर्ण
कुंतिभोज कन्या कुंतीच्या
सेवेवर दुर्वास ऋषी प्रसन्न झाले
दुर्वास ऋषींनी मग तिला
खूश होऊन एक वरदान दिले
त्याच वरदानामुळे
एकाचा जन्म झाला
कानी कुंडल अंगी कवच घेऊन
महारथी कर्ण उदयास आला
जन्म झाल्याबरोबर त्याला
गंगा नदीत सोडून द्यावं लागलं
अनौरस संतती म्हणून
लहानपणीच घोषित झालं
वाहत वाहत मग तो
राधा मातेला भेटला
सूतपुत्रच म्हणून मग
या जगाला वाटला
नाही तो क्षत्रिय म्हूणन
द्रोणाचार्यानी शिक्षण नाकारलं
सूतपुत्र आहे असं तेव्हाच
त्याने स्वीकारलं
परशुरामांकडून शिक्षा घेण्याचा
अट्टहास त्याने केला
शिकला विद्या पण क्षत्रिय नव्हता समजल्यावर
विसरून जाशील विद्या असा शाप दिला
एक गाय त्याच्या बाणांनी
चुकून मारली गेली
गायवाल्यांनी त्याची चूक नसताना
पुन्हा त्याला शापाची शिक्षा केली
द्रौपदीच्या स्वयंवरात त्याला
अपमान सहन करावा लागला
सूतपुत्र म्हणून भरसभेत
त्याच्यावर चिखल फेकला गेला
कुंतीने शेवटी त्याचं सत्य
पांडवांना वाचवण्यासाठी सांगितलं
पराभव करायला त्याचा देवांनाही
कट कारस्थान कराव लागलं
जे काही मिळाल त्याला
ते दुर्योधनाकडूनच मिळालं
म्हणूनच तर त्याचे सर्वस्व त्याने
त्याच्या दोस्तीवर वाहिलं
ना आई मिळाली ना तिचं प्रेम
उभ आयुष्यभर अपमानाचे चटके मिळाले
हा घेतली बाजू त्याने दुर्योधनाची
सांगा ना त्यात त्याचे काय चुकले
त्यात त्याचे काय चुकले