आपले
आपले
नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्य कधी उसणे घेऊन जगता येत नसते
माझ्या आयुष्याचेही मला काही कळत नाही
कितीही जाळले तरीही दुःख काही जळत नाही
असे वाटते दुःखानीच केलाय करार माझ्या हृदयाशी
माझे आपलेच खेळ खेळत आहेत माझ्या जीवाशी
आपले नेहमीच दूर असतात
दुरवरूनच पाऊलवाटेत काटे पेरत असतात
कितीही केलं तरी स्वतःलाच स्वतःच्या हाताची तक्रार करता येत नसते
आयुष्याची व्यथा कधी कोणासमोर मांडायची नसते
पाहिलय का कधी ? देवाला कोणासमोर व्यथा मांडताना
त्यालाही होतातच की इजा सांभाळ जगाचा करताना