कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील
सर्व सामान्य जनतेला
जगण्याचा आधार मिळाला
ज्ञानदानाचे कार्य करण्यास
झोपडीत ज्ञानसूर्य उगवला
रयतेच्या शिक्षणासाठी
जो चंदन होऊन झिजला
ज्याच्या कार्याचा सुगंध
दाही दिशात दरवळला
प्रकाशमान करण्यास
जीवन लाखोंचे
जो स्वतः जळाला
असा कर्मवीर सांगा
आम्हास कितपत कळाला
असंख्य आली संकटे
कित्येक मिळाली प्रलोभने
तरी नाही डगमगला
शुभ्र दाढी, पांढरे कपडे
कधी डाग ना त्यास लागला
थोर सौभाग्य महाराष्ट्राचे
हा कल्पवृक्ष त्यास लाभला
आधुनिक भगीरथाप्रमाणे
ज्याने ज्ञान गंगेचा
प्रभाव व्हायला
उच्च- निच्च,गरीब- श्रीमंत
हा भेद कधी न केला
हाच तो तपस्वी
ज्याने मुलात देव पाहिला
स्थापून "रयत संस्था"
बहुजनांचा ज्यांने
उद्धार केला
प्रणाम माझा थोर अश्या
शिक्षण महर्षीला...