गुंफण आठवणींची
गुंफण आठवणींची


मी ती लाट नाही
विचाराच्या लाटांनी किती खळखळ माजवली ,
तरी शांत होताना त्या लाटांना
नम्रपणे माघार घ्यावी लागते ....
निर्मळ मनाने काठावरती ,
आठवणींच बांडगुळ उतरवून
त्या निश्चलपणे परतत असतात।
तेंव्हा मलाही वाटत असते
आपणही हे ओझं घेऊन
कुठवर फिरणार वाहणार आहोत ,?
किनारा आला की ,
सोडून द्यायच्या आहेत गाठोड्यातल्या
जीर्ण म्हणता येणार नाहीत पण
पुसट होत जाणाऱ्या
काही धुरकट आठवणी,।
सोडल्यास का मग ?
सहज विचारलं काठांनी
वाळूतल्या किटकांनी ,।
लाटा म्हणाल्या हो! हे काय !
त्या किनार्यवर आणून टाकलेली
ही नकोशी संपत्ती आता तूच सांभाळ,।
ओझं कमी होईल समुद्राचं तेवढच..
,शांतपणे निघून गेल्या लाटा
त्या खोलवर रुजलेल्या
आठवणींना सांडून सोडून, ।
जाताना बजावलंय .
..पुन्हा नाही तू ,समुद्रात विलीन व्हायचस
जमणार आहे का हे मला!
नाही !कधीच नाही ,का ?
कारण ?...
कारण,मी ती लाट नाही।