STORYMIRROR

Vrushali Vajrinkar

Romance Tragedy

3  

Vrushali Vajrinkar

Romance Tragedy

भावना

भावना

1 min
163

डोळ्यात एक थेंबही नाही आला,

तुला आठवताना...

खरंच सावरलाय का मन, 

की कोरड्या झाल्यात भावना...


इतक्यात असं काय घडलं ?

विरहात हुरहूरणार मन

 रडायचं धाय मोकलून...

 ‎ते अचानकच ,

 ‎का बरं समजूतदार बनलं..!


 ‎हसण्यावारी विसरत जाणारे ते क्षण

 ‎आता इतके मग्रूर झालेत का ...

 ‎कि हास्यामागे लपलेल्या थेंबाला

 ‎ त्यांनी ओघळूही देऊ नये खाली...?


 ‎तुला आठवताना 

 ‎ माझ्या डोळ्यात आता ....

 ‎येत नाही पाणी ..येत नाही पाणी!

 ‎खरेच सावरलाय का मन

 ‎की कोरड्या झाल्यात भावना...?

आठवणी अशाच असतात ,

येत राहतात क्षणोक्षणी..

काय झाले नाही आले जरी,

डोळ्यात पाणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance