आनंदी प्रेम
आनंदी प्रेम
कितीही झाल्या प्रेमावर कविता तरी कुणी कुणावर प्रेम करत नसत
पहिली पेक्षा दुसरी चांगली भेटली की पुन्हा आपण सुधारलोत असं समजायचं नसत
प्रेमात पडण्या अगोदर आपणच एकटे आहोत की काय असे वाटत असते
पण प्रेमात पडल्यावर मात्र आपण चुकलो की काय असे वाटून घ्यायचे नसते
प्रेम करत असताना मार्गात येतात खूप काटे
मात्र मित्र नसतील सोबतीला तर भेटत नाहीत बाहेर पडायचे फाटे
कितीही झालो प्रेमात मध्ये आंधळे तरी डोळे बंद करून घ्यायचे नसते
कारण शेवट मात्र ठरलेला असतो आपल्यालाच आपले उरकायचे असते
म्हणूनच प्रेमामध्ये कधी हरायचे नसते
हाती घेतलेलं काम पूर्ण करायचे असते
भावुक झालेल्या भावनांना कधी दुखवायचे नसते
कितीही झाले तरी ते आपल्या आयुष्याचे सुख झालेले असते
लपून छपून का होईना आयुष्य मध्ये एकदा तरी प्रेम करायचे असते
त्यातच आपले आनंदी आयुष्य घालवायचे असते