भिऊ नको तू कधी
भिऊ नको तू कधी
जीवनाच्या रणांगणावर
संकटे नेहमी येणारच
युद्धभूमी ही लक्षात ठेव
सावध रहावे लागणारच
नको मिळमिळीत जीवन
असू दे त्यात खुमारीही
सुख दुःख समे कृत्वा
जाणवेल तुला तेव्हाही
संकटाच्या फक्त कल्पनेने
नको मनोधैर्य सोडू कधी
उगाची भितोसी भय पळू दे
नको घाबरु तू वृथा मनी
स्वामी समर्थ जप करावा
पूजापाठही नित्य करावा
पाठीशी उभा आहे भक्तांच्या
श्रद्धा तसे फल मिळे तयाला