आयुष्याच्या वळणावर
आयुष्याच्या वळणावर
दुसऱ्याच्या प्रगतीवर
जळायचे नसते
स्वकर्तुत्वाने पुढे
जायचे असते
कोणी पुढे गेले तर
पाय खेचायचा नसतो
चांगलं तेवढं घेऊन
विषय सोडायचा असतो
निराशावादी कधी
व्हायचे नसते
आपली ताकद आपणच
ओळखायची असते
स्वतःची स्वतंत्र अशी
ओळख करायची असते
गुरुकिल्लीचा वापर करत
पाऊल टाकायचे असते
खाचखळगे आले तर
डगमगायचे नसते
परत उभा राहून नव्याने
सुरुवात करायची असते
नशिबाला दोष देत
बसायचे नसते
नशीब बदलवण्याची क्षमता
बाळगायची असते
काल काय झाले ह्याचा
विचार करायचा नसतो
आत्ताचा क्षण आनंदाने
जगायचा असतो
अपयशाने कधीच
खचून जायचे नसते
यश खेचून आणण्याची
तयारी करायची असते
अवघड गोष्टी हाती घेऊन
पूर्ण करायच्या असतात
आयुष्यात नवनवीन
आव्हाने पेलायची असतात
मनातल्या मनात
कुढायचे नसते
आपल्या लोकांसमोर
व्यक्त व्हायचे असते
मदतीची गरज असेल तर
मागेपुढे पहायचे नसते
आपणहून वेळेला धावून
जायचे असते
व्यसनाच्या आहारी जाऊन
जीवन संपवायचे नसते
सत्कर्म करून समाधान
मिळवायचे असते