या वळणांवर
या वळणांवर
मनपटलावर उगवते जेव्हा
आशेची नवीं पहाट
उमटते दररोज
जगण्याची नवी वाट
स्वप्न बदलते सुर
बेसुरता येई जीवनाला
अनुभव येई भेटीला मग
अगदी धावून मदतीला
या वळणांवर
जोम जोमाने चढतो
वाढूनी महत्त्वकांक्षा
जिणं नवं सावरतो
गाऊन दुःखाचे गाणे
मनीचा आनंद हिरावतो
मग धागा संपत येते
अन् क्षण चिंतनाचा येतो
जगलो किती, भिऊन या मरणाला
जगण्याची हाव केली प्रत्येक घडीला
पण सोडुनी माणुसकी, वैर जेव्हा जपलो
तेव्हा जीवनाला, अर्थ उरला नव्हता