वास्तव
वास्तव
किती केला आटापिटा
बदलत नाहीच वास्तव
शांत होतो ओरडणारा
बसतो गप्प लज्जेस्तव
करतात हांजी हांजीच
सुधारत नाहीत माणसं
डोलती मुक्त वाऱ्यासंगे
जशी रानातली कणसं
परिस्थिती बदलण्यास
आले कित्येक सुधारक
दंगाधोपा अन् मारझोड
संपत नाही हे अराजक
असुनि साक्षर सुशिक्षित
ही माणसं म्हणू की मेंढरं
मनमानी करी वाटेल तशी
झालेय काळ्याचंच पांढरं
संपलीत कितीतरी दशकं
शिकवण देणारेही खपले
माणुसकीचे असे हे मोल
कोणी कधी नाही जपले
भांडण झगडा मारामारी
रोजचेच असती हेवेदावे
उगवत्या नव्या पिढीपुढे
डोळ्यांसमोर हेच दिसावे