संकट...संधी...!
संकट...संधी...!
केरळच्या शापाने
व्यापला आसमंत
बोला आता आपण
काय करायचं हो पंत....?
पंत म्हणे
संकटाला घाबरू नका
हीच संधी प्रगतीची
हे कधी विसरू नका....!
दोन हात संकटाशी करता
संकट पाय लावून पळून जाईल
सौख्य शांती समाधान
जीवनात पुन्हा मग वळून येईल...!
संकटाला संधी समजून
सोने त्या संधीचे होऊ दे
मोडले संसार सारे देवा
नव्याने पुन्हा त्यांना मांडू दे....!!!