सामर्थ्य लेखणीचे
सामर्थ्य लेखणीचे
महात्मा फुले यांनी
आसूड तो ओढला
प्रस्थापित व्यवस्थेचा
बुरखाच फाडला
मुक्ता साळवेने
निबंध तो लिहिला
मला धर्मच नाही
खडा सवाल मांडला
डॉ. बाबासाहेबांनी
लिहिले संविधानाला
जगात सर्वश्रेष्ठ ते
ठरविले भारताला
सामर्थ्य लेखणीचे
जाणिले ज्यांनी
जगातील क्रांती
घडविली त्यांनी