रम्य
रम्य
नकोशी वाटे, ही सांजवेळ....
केव्हातरी...
जेव्हा, विचित्र भास मनासंगे खेळती..
आपोआप नजरा उंबरठ्यावर वळती...
अन् नकळतच वाटेवरी पावले धावती...
ह्रदयातील ठोके जणू ,
सेकंदी काट्याला ही मागे टाकती...
जीवास अकारण घोर लागती.....
आठवे पुराण,पारायणातील महती..
अश्या सांजवेळी मन जेव्हा काहूरती...
घ्यावे स्वामी नामस्मरण,भिती दूर पळती..
दिवा लावता देवापुढे, काळजी सर्व मिटती....
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी"
असे खुद्द स्वामीच म्हणती.....
नसे ही काहूर मनी...
आता ही सांजवेळ ही सुंदर भासती....