राजा शिवछत्रपती
राजा शिवछत्रपती
झाले बहु होतील बहु
परि या सम हा
छत्रपती शिवरायांनी दिला
स्वराज्याचा मंत्र महान
माता जिजाऊच्या पोटी
झाला जन्म शिवनेरीवर
पिता शहाजींना मिळाला
शिवाई देवीचा वर
स्वप्न होते जिजामातांचे
स्वराज्य असावे स्वहक्काचे
नको गुलामी परक्यांची
राज्य व्हावे न्यायाचे आणि मुक्तीचे
करावया पूर्ण स्वप्न मातेचे
संघटन केले मावळ्यांचे
करुन अभिषेक रक्ताचा रायरेश्वराला
प्रतिज्ञा केली स्वराज्यस्थापनेची
घेऊन मावळ्यांना साथीला
तोरण्यावर बांधले तोरण स्वराज्याचे
राजगड सजली पहिली राजधानी स्वराज्याची
मां जिजाऊ पिता शहाजींचा घेऊन आशिर्वाद
सुरु झाली घौडदौड
सुराज्य आणि स्वराज्याची
गुरु दादाजी कोंडदेवांच्या
शिकवणीचे सार्थक हो झाले
अफजलखानासारखे बलाढ्य शत्रू
शिवबाने लीलया मारले
बाजीप्रभू, तानाजी,बाजी
अशी जिवाला जीव देणारी
माणसे होती पराक्रमी
स्वराज्यासाठी प्राणाची पर्वा न करणारी
स्वराज्यात होता प्रत्येक स्त्रीचा
माता- भगिनीप्रमाणे सन्मान
जातीपातीचा नव्हता कोणताही भेद
स्वराज्यात सगळेच होते एकसमान
शिवराज्याभिषेकाचा सोहळा होता
डोळ्यांचे पारणे फेडणारा
गागाभट्टांच्या मंत्रघोषात
दुमदुमला परिसर रायगडाचा
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग म्हणून
३०० किल्ल्यांचे केले जतन प्राणपणाने
आरमाराचे जनक बनून
दिले उदाहरण दूरदृष्टीचे
करुन वापर गनिमी काव्याचा
उडवली शत्रुची दाणादाण
अष्टप्रधान मंडळ करुन साकार
राज्यकारभाराची घडी बसवली छान
दुर्जनांचा कर्दनकाळ अन् लोककल्याणकारी प्रशासक
सज्जनांचा कैवारी अन् कुशल संघटक
नव्या युगाचा निर्माता अन् सावध नेते
नाही होणार राजा पुन्हा ऐसा
जसे आपले शिवछत्रपती होते