निसर्ग किमया..
निसर्ग किमया..
झाला उन्हाळाच सारा
कसे जगतील लोक,
राणी पेटला वणवा
गेलं करपून. पिकं.
डोळ्यात पाणी आलं
वाट पाहून पावसाची,
पाऊस पहात असेल वाट
आता कोणत्या नवसाची.
उभा दुष्काळ पुढ्यात
सरली जगण्याची आस,
जीव तळमळला फार
करून पावसासाठी नवस.
काय खावं,काय प्यावं
कसं जगावं, मरावं
पाणी पाणी करून
जाई आजच हा जीव.
व्रक्षतोडीने केला
माणसानेच सारा घात,
माणसा माणसा
जीव धर रे मुठीत.
दिसे मरण डोळयाला
कसं पेटेल सरण,
कुठे मिळतील लाकडं
झाडे टाकली तोडून.
आता तरी जागे व्हा रे
झाडे लावा सरणासाठी,
आता सारेच मरणार
किमया निसर्गाची मोठी.