नाही
नाही
खूप काही असत नाही या शब्दात
पण सर्वानाच ते कळत नाही
अबोल शब्दांचा भाव काय आहे
तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही
शांततेत खूप मोठं वादळ असत
हे कधी कोणाला जाणवतच नाही
गर्दीतही कोणीतरी पाखरू
एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही
बाहेरून आनंदी असणारी व्यक्ती आतून किती
कोलमडली आहे हे कधी कळतच नाही
जे नको असत ते न मागता ही मिळत
पण मनापासून जे हवं असत ते सहजासहजी कधी मिळत नाही
जे आपल्या परिचयाचे असतात खर तर ते
कधीही आपल्याला खऱ्या अर्थाने ओळ्खतच नाही
छोटंसं असणार मन आणि छोटीशी त्याची स्वप्नं
सर्वानाच जपता येत नाही
सर्वानाच जपता येत नाही....