महात्मा जोतिबा फुले
महात्मा जोतिबा फुले
महात्मा जोतीराव फुले ,
होते दूरदृष्टीचे समाजसुधारक ।
शुद्रांना सरकारी शाळेत भरा ,
असे निर्देश देणारे कर्तेसुधारक ।।
काळाच्या पुढे विचार करुन ,
शिक्षणाचे महत्त्व समजून घोणारे ।
स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व देऊन ,
त्यांच्यासाठी पहिली शाळा काढणारे ॥
जाती , पंथ , धर्म न मानणारे ,
स्वभाषा व स्वदेशीचा अंगिकार केला ।
आईला " विश्वमाता ” ची संकल्पना मानून ,
सत्यधर्माचा महत्त्व पटवून दिला ||
महात्मा फुले यांनी समाजातील ,
विषमतेचे भयान वास्तव पाहिले ।
त्यानंतरच त्यांच्या लेखनीतून ,
साहित्य अविष्कारीत झाले ॥
ईश्वर हा निर्मिळ आहे ,
साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे ।
पाप - पुण्य , स्वर्ग - नरक ,
या मानव निर्मीत कल्पना आहे ||
असे सांगणारे जोतीराव फुले ,
ब्राम्हणांना ही गवसले नाही ।
त्यांच्या विचारांचे ते धनी ,
महात्मा म्हणून कोणी रोखू शकले नाही ॥
=======================