कथा
कथा
आयुष्य उध्वस्त होत गेलंय
एखाद्या चरितार्थाच्या प्रश्नांसारखं
जुळवत आणलेले धागे
तुटततुटत गेले कारण नसताना
कुठल्याच गोष्टीचे लगाम हाती नव्हते
even स्वतःचेसुद्धा
कधीमधी येणारे प्रामाणिक
आक्रोशही आता गोठून गेलेत
या नकली विस्मरणाच्या गर्तेत
सुपाएवढं मन करून
जगण्याचे सारे प्रयोगही
आता हास्यास्पद झालेत
पावलं पिंजून काढणाऱ्या
रस्त्याची जवळीक वाढत चाललीय
सर्व क्षणांचे चेहरे
कित्येक आठवणी
देहांच्या हाका आणि
मनांचे तलम पापुद्रे सांधताना
उगीचच बदनाम झाल्या
चार डोळ्यांच्या त्या कथा
सांगूनही खरी वाटणार नाही आणि
आज ओळखही नाकारेल आरसाही
आणि प्राक्तन .......
हे तर आपल्या हातातच नाही
मग त्याचा विचार का ???
आणि कशासाठी