क्रांतीसुर्य
क्रांतीसुर्य
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
महाराष्ट्राच्या मातीत जन्मले,
दोन क्रांतीसुर्य महान...
एक तलवार तळपती मराठ्यांची,
अन् एक दलितांचा अभिमान..
यवनांच्या कौर्यात जेव्हा
कुढत होती धरती,
लाचार होते फितूर सारे...
नव्हती कुणा उपरती.
धर्म,देश अन् मातीलाही..
पुन्हा उभारी दिली.
जागवया राष्ट्रधर्म हाक राजांची आली.
शब्दाखातर एका तेव्हा,
कित्येक वीर धावले...
सळसळले रक्त अन्,
स्वराज्य उभे पावले.
एकच झाला राजा माझा..
शिवबा असा निर्माण...
प्रत्येकाच्या श्वासामध्ये,
फुंकून गेला प्राण...
भीमरावांनी आपल्यासाठी
काय असे हो केले..
माणूस म्हणून जगण्याचे..
वरदान आम्हाला दिले.
पशुपेक्षाही वाईट जगणे..
जगत होतो आम्ही..
दिली उभारी,जागवून आम्हा..
समर्थ केले तुम्ही.
येतील किती आणि जातील किती
कुणी होणार ना असे निर्माण...
खंत वाटते आम्हा जेव्हा,
आज होतो तुमचा वापर.
राजकारण आणि सत्तेसाठी..
जाणून होतो बरं....
आज शिवरायांची तलवार पुन्हा,
कलम बनून यावी.
आणि भीमरायांची कलम,
पुन्हा तलवार व्हावी.
बेगडी ,नाटकी अनुयायांना..
संदेश द्यावा खरा.
शिव - भीम आहे एकच..
फक्त या मातीला स्मरा.
वाद विवाद सोडून सारे,
विकास राज्याचा करा...
माणुसकीसाठी लढलो आम्ही..
तुम्ही माणूस होऊन तरा..
येतील किती आणि जातील किती
कुणी होणार ना असे निर्माण.
एक तलवार तळपती मराठ्यांची,
अन् एक दलितांचा अभिमान