जीवन
जीवन
जीवनात माणसाने
सतत आनंदी रहावे ,
चिंताग्रस्त आयुष्य
कधीच नाही जगावे .
एकटेपणाने कधीच
न राहता एकत्र रहावे ,
सगळ्यांना सांभाळून
आपले कार्य करावे .
सुख आणि दुःखांना
जिद्दीने सामोरे जावे ,
कधीही हार न मानता
प्रयत्न चालू ठेवावे .
जीवनाच्या लढाईत
सर्वांनी तरबेज व्हावे ,
सतत कार्य करून
यश पदरात घ्यावे .
© धनराज संदेश गमरे
