गरिबांना वाली नसतो
गरिबांना वाली नसतो
सरकार असतंच जनतेच्या भल्यासाठी
पण तसं मुळीच नसतं,
राजकारणी, पुढारी, नेत्यांना
घर स्वतःचं च भरायंचं असतं.
जनतेच्या भल्यासाठी मुळीच
नसतात कोणतेच राजकारणी,
त्यांनी जर केलं असतं भलं तर
स्वर्ग च झाली असती ही धरणी.
लुटतात साले लबाड बोलून
निवडून येतात पैसा वाटून,
करोडोंची संपत्ती त्यांची
ती येते तरी सांगा कोठून ?
शंभर पिढ्या बसून खातील
एवढे ते देशाला लुटतात,
बेकार कार्यकर्ते जयजयकार करीत
तळवे त्यांचे फुकट चाटतात.
नको ते धंदे राजकारण्यांचे
पोसले जातात हरामी गुंडे,
दंगली,घात,पात, मोर्चे, हिंसा
रोज नवे पक्ष,नवेच झेंडे.
प्रामाणिकपणा,इमान, माणुसकी
मातीत मिळवली सारी,
बेहाल गरीब,शेतकरी,मजूर
करोडपती मजेत भ्रष्टाचारी.
कष्ट करून मरतात बिचारे
गरीबांना वाली नसतो,
सीमेवर बलिदान देतो जवान
पोशिंदा उपाशीच हा असतो.
देश केला बरबाद लुटून
ह्या इंग्रजांच्या औलादिंनी,
क्रांतीची हाक देते तुम्हाला
सुपुत्रांनो तुमची भारतभूमी.
महागाई ,बेकारी वाढली
वेळ उपासमारीची आली,
गरिबांना वाली नसतो
कशी काळरात्र ही झाली.
उठा घेऊन आता मशाली
अरे अंधार फार हा झाला,
क्रांतीचा जयजयकार बोला
करुन वंदन भारतमातेला...