Shop now in Amazon Great Indian Festival. Click here.
Shop now in Amazon Great Indian Festival. Click here.

Avinash thakur

Inspirational

3  

Avinash thakur

Inspirational

घडामोडी

घडामोडी

1 min
139


कुठ गेल ते पाटांच शुद्ध झुळझुळ पाणी,

 नदी नाल्यांना दुशित केल कुणी ....

कुठ गेल खाद्य गावरान ,

 आता संकरीतमुळे आजाराने झाले हैराण ...

कुठं गेली ती पक्ष्यांची मंजुळ गाणी ,

आता पक्ष्यांना नाही राहील प्यायला शुद्ध पाणी ...

कुठं गेल ते गावाच गावपण ,

 आता जो तो दाखवतो स्वतःच शहाणपण

कुठं गेला तो आजीबाईचा बटवा,

 आताची पोर सांभाळतील का आता आठवा...

कुठं गेल्या त्या लग्नाच्या पंगतीच्या पंगती ,

आता कार्यालयात चार बसती तर चार उठती 

कुठं गेली ती वृक्षाची छाया ,

आता वृक्षतोड करणायांना नाही राहीली दयामया

कुठं गेला तो हदयाचा ओलावा

 आता हदय कोरड ठणठणीत आत फक्त हवा

कुठ गेल ते खुषालीच पत्र

आता मोबाईलवर वेगळच दिसतय चित्र ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational