घडामोडी
घडामोडी
पुर्वी होता कंदिलाचा आधार
त्याची ज्योत होती सुंदर फार,
टाता विजेचा लंपडाव होतोय दारोदार ।
पूर्वी खारीक खोबारयावरती जोर,
त्यामुळे लोक दिसायचे दिमाखदार,
टाता संकरीतमुळे आजाराने झाले बंजार ।
पुर्वी लग्न होत होते दारासमोर,
आणि मिळायचा प्रेमाचा आहेर,
आता कार्यालयात कोण कोणाचा करतो विचार ।
पुर्वी स्त्रियांचा असायचा डोक्यावर पदर ।
आता डोईचा पदर आला खांद्यावर
आणि खांद्याचा पदर आला गुडघ्यावर,
पूर्वी लग्नाच्या पंक्ती पडायच्या दारासमोर,
ष्लोक म्हटल्याषिवाय नाहीच जेवण सुरु करणार,
आता लोणच पापड आल्यावर लगेचच खायला सुरु करणार ।
पूर्वी लोक क्वचितच बोलायचे फोनवर
आता मोबाईल, संगणकचा भरला बाजार,
त्यामुळे लोक झाले अतिहुषार ।