STORYMIRROR

Sailee Rane

Tragedy

4  

Sailee Rane

Tragedy

गड

गड

1 min
231

शिवरायांच्या काळात

महत्त्व होते गडांना

म्हणूनच दूरदृष्टीने 

त्यांनी हेरलेले त्यांना


एक एक गडासाठी

वेचला होता मोहरा

बाजीप्रभू,तानाजी परि

स्वामिनिष्ठ होता खरा


गडावर करता आले राज्य

म्हणूनच स्वराज्य मिळाले

गनिमीकावा खेळून सारे

मुघल राज्य लयाला नेले


इतक्या भक्कम गडांना

पण आज आलीय अवकळा

भिंतींची झालीय तोडमोड

आणि केरकचरा झालाय गोळा


सृष्टी सौंदर्य गडाचे

ठरलंय मातीमोल

म्हणूनच निसर्गसौंदर्याचा

ठळतोय तोल


चला साऱ्यांनी पण करू

गडाचे रक्षण करू

शिवबाच्या आठवणींना

चिरकाल जतन करू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy