एकदा काय झाले?
एकदा काय झाले?
एकदा काय झाले?
गणपती बाप्पा पृथ्वीवर अवतरले
सर्वत्र उत्साहात फिरू लागले
मात्र आजचा गणेशोत्सव बघून निराश झाले
बाप्पाने जनजागृती करावयाचे ठरविले
लोकांना एकत्र करून सांगू लागले
नका करू वर्गणीचा अट्टाहास
मला आहे साधेपणाची आस
शाडूच्या मातीचा वापर करा
टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची नवनिर्मिती करा
आरास करताना पर्यावरणाचे ठेवा भान
नैसर्गिक साधनसंपत्तीचा ठेवा तुम्ही मान
ध्वनी आणि वायूचे प्रदूषण टाळा
निसर्गाचा नियम पाळा
सोन्या-चांदीची नाही मला हाव
सदैव मनी ठेवा माणुसकीचा भाव
समजावून सांगितले,ना लय भारी
एवढे बोलून बाप्पाची निघाली स्वारी
चला मित्रांनो, संकल्प योजूया
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया