छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
जातीभेद विसरूनी
सर्वांना एकत्र करूनी
शपथ स्वराज्याची घेतली
पाठीशी जिजाऊ माऊली
मुस्लिमांविरोधात उठविले रान
परस्त्रीचा ठेवूनी मान
गडकिल्ले जिंकून घेतले
अटकेपार झेंडे लावले
पराक्रमी, गुणवंत, दूरदृष्टी ठेवणारा
रयतेच्या सेवेला तत्पर असणारा
असा राजा होता रयतेचा
त्यांना आपला मुजरा मानाचा
विचारांचे जतन करूनी
जीवनी ते अंगीकारूनी
वसा हा घेऊ या
पुन्हा सुराज्य आणू या