STORYMIRROR

Bharati Sawant

Tragedy

3  

Bharati Sawant

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
897


आला भीषण दुष्काळ

तळपे सूर्य माथ्यावर

मुक्या पशुपक्ष्यांची दशा

वाटे केव्हा येईल सुकाळ


आटले नद्या नाले सारें

तहानली लहानथोरं

थेंब मिळंना पाण्याचा

तोंड वासत्याती जनावरं


पीकं गेल्याती वाळून

शेतंरानंबी भेगाळली

कवा पावंल वरुणदेव

बळीराजा पाहें वाटुली


सावकाराच्या कर्जापायी

बळीराजा घेई गळफास

गळाठला तो दुष्काळानं

.काय सांगील लेकरांस


केली गलती आम्ही

वृक्षवेली तोडण्याची

... नको देऊ सजा देवा

दुष्काळाच्या आपत्तीची


करुनि वृक्षारोपण

झाडें वाढवू रानांत

लेकरांच्या आयुष्याची

नको आता वाताहात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy