चेहरे अनेक भावना एकच..माणुसकी!
चेहरे अनेक भावना एकच..माणुसकी!
भव्यरूपी थाटलेला संसार
क्षणात गेला वाहून ,
कमावलेला जमावलेला साज
पापणी लवताच गेला धुवून ...!!१!!
पाणी नाही पाऊस नाही
दुष्काळाच सावट होतं दिसलं,
तोच पाऊस नि पाणी काळ घेऊन येईल
असं मनात ही नव्हतं वाटलं...!!२!!
सांगली,कोल्हापूरवर कसे
असे हे नशीब कोपले,
गाय, वासरे नि माणसे
यांना अश्रुंचे बांध फोडले...!!३!!
वेळप्रसंगी कोणाला खांदा तर
कोणाला मदतीचा हात दिला,
माणुसकीच्या चेहऱ्यांनी
सुखरूप असा आसरा दिला...!!३!!
काहीच नाही उरलं सगळं गेलं वाहून,
महाराष्ट्र पोलीस नि इंडियन आर्मी यांच्यासमवेत माणुसकीच्या नात्याने आपल्या बांधवांना चला,आपण पुन्हा उभे करू...!!५!!