आठवणी
आठवणी
खुप गोष्टी
अशा असतात,
आठवणींच वादळ
घेऊन येतात...
नकळत डोळ्यांची
कड ओली होते,
बेधुंद आठवणींमध्ये
मन रमून जाते...
भूतकाळ आजपेक्षा
नवा वाटतो,
निघून गेलेला असला तरी
पुनः हवाहवासा वाटतो...
मनाला स्पर्शून
आठवणी निघुन जातात,
निघून गेलेल्या क्षणांची
पुसटशी छबी सोडून जातात...