भारत
भारत
मिळाले मोठ्या दिमाखात भारताला स्वातंत्र्य
त्यासाठी लावले कोणी वेगेळेच तंत्र .
केले त्यासाठी ज्यांनी अहिंसेचे आंदोलन,
यदिवशी येते गांधींची आठवण.
लिहिली आंबेडकरांनी राज्यघटना भारताची,
त्यांच्यामुळे झाली दीनदलितांची प्रगती.
आहे भारतात पद्धत लोकशाहीची,
आले सर्व हक्क सर्वसामान्यांच्या पाशी .
रक्षणासाठी देशाचा लढतोय जवान,
आपणही ठेवायला हवे देशाचे भान.
आहे भारत देश कृषीप्रधान ,
मात्र देत नाही शेतकरयाला "नेते" त्याचा मान.
होतोय हळूहळू भारतात बदल,
मात्र त्यात आहे भ्रष्टाचाराची दलदल.
जर होइल भारतात उत्तम शिक्षणाची निर्मिती
तरच होइल उत्तम भारताची प्रगती.