STORYMIRROR

Akshay Mahajan

Inspirational

3  

Akshay Mahajan

Inspirational

भारत

भारत

1 min
242

मिळाले मोठ्या दिमाखात भारताला स्वातंत्र्य

त्यासाठी लावले कोणी वेगेळेच तंत्र .

केले त्यासाठी ज्यांनी अहिंसेचे आंदोलन,

यदिवशी येते गांधींची आठवण.


लिहिली आंबेडकरांनी राज्यघटना भारताची,

त्यांच्यामुळे झाली दीनदलितांची प्रगती.

आहे भारतात पद्धत लोकशाहीची,

आले सर्व हक्क सर्वसामान्यांच्या पाशी .


रक्षणासाठी देशाचा लढतोय जवान,

आपणही ठेवायला हवे देशाचे भान.

आहे भारत देश कृषीप्रधान ,

मात्र देत नाही शेतकरयाला "नेते" त्याचा मान.


होतोय हळूहळू भारतात बदल,

मात्र त्यात आहे भ्रष्टाचाराची दलदल.   

 जर होइल भारतात उत्तम शिक्षणाची निर्मिती

तरच होइल उत्तम भारताची प्रगती.

     


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational