अंतिम सत्य.... सुखाचं
अंतिम सत्य.... सुखाचं
तीन बहिणीच्या पाठीवर,
जन्म तिचा झाला...
मुलगी पाहताच सर्वांनांच,
तिचा खूपच राग आला....
जन्मावेळी नियतीने,
आईस तिच्या गिळले...
चेहराच काय त्या मुलीला ,
दूध ही पाहावयास नाही मिळले....
पुढे जगताना तिचे,
जीवन खूपच खडतर गेले....
अर्धवट वयाचा नवरा पाहून,
घरातल्यानी लग्न तिचे केले.....
सुरुवातीची काही वर्षे,
गेली तिची सुखात....
पण एके दिवशी तिच्या कुंकवाची,
अचानक विझली वात...
पुढील आयुष्य त्या माऊलीने,
मुलांसाठी वेचले...
पुढे सुखाची हिरवळ दिसताना,
देवाने ही तिला खेचले......
त्या माऊलीवर कविता रचताना,
एवढे मला कळाले....
जगातील दुःखापेक्षा कमी दुःख,
मला जीवनात मिळाले....