आतंकवाद
आतंकवाद
माणसाचं कर्तव्य आहे जागतिक शांतता स्थापन करणं
अतिरेक्यांना हवं असतं निष्पापांचं अकाली मरणं
शांततेचा भंग करुन त्यांना काय मिळतं काय माहित
कुठलाही निर्णय घेता येत नाही प्रशासनाला घाईत
देशांतर्गत राजकारणाने सुटू नयेत खरे गुन्हेगार,
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट होतो फार
अतिरेकी उतरतात देशात घडवण्यासाठी दंगा
माहित नसतं त्यांना कुणाशी घेतात पंगा
आपली सुरक्षा यंत्रणा आहे चोख बजावते कर्तव्य आपलं
कितीतरी अतिरेक्यांना तिने लीलया टिपलं
अतिरेक्यांच्या जर आहेत संघटना तर नागरिकांनीही संघटन करावं
पोलिसांना सहकार्य करुन आतंकवादाला जगातून दूर सारावं
ही विकृती पसरु नये समाजात व्हावी लवकरच नष्ट
माणुसकी प्रस्थापित व्हायला पडतील थोडे कष्ट