आरसा बोलला
आरसा बोलला
मी नेहमीच समजावतो मनाला
उगीच लावू नये शक्ती पनाला
निर्दोष असतात ही वने सारी
तरीही वनवा लागतो वनाला
रिता झाला गांव माझा माणसांनी
जो-तो विचारी जात जना-जनाला
हो स्वतःच स्वतःचा तूं पाठीराखा
कुणी नं येणार तुझ्या रक्षणाला
दोष कर्णाचा एवढांच माधवा
त्याने पाळले दिलेल्या वचनाला
काल तुझ्याकडे आरसा बोलला
दृष्ट नं लागावी तुझ्या यौवनाला