कविता- आर्तता मनीची
कविता- आर्तता मनीची
कबूल करून येत नाही
आल्यावर जाण्याची घाई
थांब म्हटले तर तेही नाही
असे येणे मज मंजूर नाही...
ठरले आता बोलणे नाही
बसलो रुसून जरासा पण
दिसलीस तू येतांना इकडे
मग यातले काहीच झाले नाही..
नको विरह असा जीवघेणा
नको प्रतीक्षा व्याकुळतेची
नको दुरावा आपल्यात हा
समजून घे आर्तता मनीची
दिस कलता भेट जाहली
काही शिकायत ना राहिली
शब्द पडले कानी गोड तुझे
अहा किती छान झुळूक आली..