ते ३० दिवस
ते ३० दिवस
उशीर झाला म्हणून काय झाले
अजून वेळ आहे . .
डबडबलेले डोळे पुन्हा ओघळले
ती सायंकाळ आठवण आहे. .
फडफड पापणी काही सांगत होती
दुर दुर माणस जात होती. .
अंधकारमय जीवनात मेैत्रीची साथ होती
पडलो तरी ऊठवण्याची ताकद होती. .
जागुन निघाल्या त्या ३० राती आठवणीच्या तिमीरावर
काटा अंगावरी शहरला अन अश्रु किनार्यांवर . .
दोष हा कोनाचा तर आजाराचा की माणसांचा
न उमगला ना कळला शेवटच्या घटीकांचा . .
शुन्य झाली बाकी तेव्हा उत्तर मिळाले
निचपणा मानसांचा भाजक म्हणुन जुळाला. .
शोधतो आहे मी जीवनाचा सार
सारासार विचार केला तेव्हा कळल खुप आहे काम. .
पडलो तडफडलो झगडलो तरी हार नाही मानत
अखेरच्या श्वासापर्यंत तुच राहील स्मरणात. .
कुठ चुकलो माखलो तर देवा मला माफ कर
जीवनाच्या प्रवासात कठीन प्रसंग दुर कर. .
खुप वागलो चांगला म्हणुन कोन दु:ख वाटुन घेत नाही
पुरत काय ऊरत काय ते कधी कळत नाही. .
संपले ३० दिवस तुझ्या मरणाच्या काचोळ्यावर
सात तारिख तुझी साथ कधी अग्नीच्या विस्तवावर. .
आठवांचे आसू दररोज ढाळतो आहे
पूर्णविराम आज देतो आहे . . .