पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
पहिलं वहिलं प्रेम
कधी मरत नसतं
नवचैतन्यासारख ते
ध्यानी मनी असतं
म्हणूनच जीवनात
हसण्याच कारण प्रेम असतं
त्यामुळे होणाऱ्या विरहाने
रडणार ते प्रांजळ मन असतं
मनातील होणाऱ्या भावना कल्लोळाच
ते प्रतिबिंब असतं
सोप नसतं इथे प्रेमी होणं
त्या शपथांना खर ठरवन.
देहाच्या मागे धावणारे बहु दिसतील
पण खर प्रेम करणारे क्वचितच आढळतील
म्हणूनच तर आयुष्यात तेच नशीबवान असतात
ज्यांना प्रेम मिळत असत
पहिल्या प्रेमाची संगतच
जीवनात प्रेरणा देत असत
आठवणींच्या आठवणींना स्मरण
हेच तर प्रेम असत
पहिलं प्रेम यात विश्वास
हेच मूळ असत
आणि त्या अतूट विश्वासावरच
पहिलं प्रेम निर्भर असत
जातो जेव्हा या विश्वासाला तडा
तेच मन पुन्हा प्रेम करायला धजत नसतं
म्हणूनच ते ध्यानी मनी अंतरी
पुन्हा पुन्हा स्मरत असतं
पहिलं वहिलं प्रेम
कधी मरत नसतं
म्हणूनच तर ते
पुन्हा पुन्हा स्मरत असत.